पुणे – वसुंधरा राजे सिंधिया म्हणाल्या, महिलांना कधीही कमकवूत समजू नका. कारण कोविडच्या काळात महिला डॉक्टर आणि नर्सेस यांनी या देशात खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. आज देशातील प्रत्येक महिलेने उच्च शिक्षण घेतले तर येणारी पिढी ही कधीही अशिक्षित राहणार नाही, असे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी म्हंटले आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे दुसऱ्या राष्ट्रीय महिला संसदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. ही संसद 14 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री देवाश्री चौधरी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय आदिवासी कामकाज राज्यमंत्री रेणुका सिंग, नृत्यंगणा डॉ. मल्लिका साराभाई, पार्श्वगायक कैलास खेर आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू छाब्रिया यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड हे होते.