मुंबई – मावळत्या विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. त्याआधी नवे सरकार स्थापन झाले नाहीतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते, असे अंदाज वर्तवले जात आहेत. तसेच आज काही निर्णय झाला नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत काही दिवसांपासून दररोज सकाळी ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे सूचक संदेश देत असल्याची चर्चा आहे. यातच त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. हे ट्विट कोड्यात असल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, आग्नेय परीक्षा की इस घड़ी में- आइए, अर्जुन की तरह उद्घोष करें : ‘‘न दैन्यं न पलायनम्।’’ – अटल बिहारी वाजपेयी (गीता का संदेश- न दैन्यं न पलायनम् अर्थात कोई दीनता नहीं चाहिए , चुनौतियों से भागना नहीं , बल्कि जूझना जरूरी है), असे ट्विट त्यांनी केले आहे.
आग्नेय परीक्षा की
इस घड़ी में-
आइए, अर्जुन की तरह
उद्घोष करें :
‘‘न दैन्यं न पलायनम्।’’
– अटल बिहारी वाजपेयी(गीता का संदेश- *न दैन्यं न पलायनम्* अर्थात कोई दीनता नहीं चाहिए , चुनौतियों से भागना नहीं , बल्कि जूझना जरूरी है)
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 8, 2019
दरम्यान, समसमान सत्तापदांचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला अडीच वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्रिपद हवे आहे. मात्र, त्या पदावरील दावा सोडण्यास भाजप तयार नाही. त्यातून सरकार स्थापनेविषयी निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे दृष्टीपथात नाहीत. त्यामुळे शिवसेना नेमकी कुठली पाऊले उचलणार आणि पुढील काही दिवसांत राजकीय स्थिती कुठल्या वळणावर असणार याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय भाजपने घेतल्याची माहिती त्या पक्षाच्या सुत्रांनी दिली. भाजपने युतीधर्माचे नेहमीच पालन केल्याचेही ठसवण्याचा प्रयत्न त्या सुत्रांनी केला. त्यातून भाजपने महायुतीच्या सरकार स्थापनेची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेवर ढकलल्याचे स्पष्ट होत आहे. भाजप, शिवसेना आणि विरोधी पक्षांनीही अजून पत्ते खोललेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत नेमके काय घडणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.