सातारा – लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार कामाच्या ठिकाणी अडकून पडले आहेत. या कामगारांच्या निवास, भोजन आणि औषोधोपचाराची जबाबदारी त्या त्या कंपन्या अथवा कारखाना व्यवस्थापनाने घ्यावी. या भयंकर साथीमध्ये सर्वांनी माणुसकी दाखावावी. मालकांनी कामगारांचे पालकत्व स्वीकारावे. त्यांना वाऱ्यावर सोडू नये, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या संस्था, कंपन्या, सहकारी व खाजगी कारखान्यांमध्ये असलेल्या परप्रांतीय कामगारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अजिंक्यतारा साखर कारखाना व सूत गिरणीतील परप्रांतीय कामगारांच्या निवास, भोजनाची सोय व्यवस्थापनाने केली आहे. इतर कंपन्या आणि कारखान्यांच्या व्यवस्थापनानेही या कामगारांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे यांनी केले आहे.