शरीर पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी, आरोग्य तज्ञांनी सर्व लोकांना नियमितपणे जीवनसत्त्वे आणि खनिजेयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. अनेक रिपोर्ट्स सुचवतात की शरीराला सहसा सर्व आवश्यक पोषक पदार्थ अन्नातून मिळत नाहीत, म्हणूनच पोषणतज्ञ आहारात फळांचा समावेश करण्यावर विशेष भर देतात. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून दोन ताजी फळे खाल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता. नियमितपणे फळांचे सेवन केल्याने वजन कमी होणे, अवयव निरोगी ठेवणे यासह अनेक प्रकारच्या जुनाट आजारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे की आरोग्यासाठी दररोज फळांचे सेवन करणे आवश्यक आहे, परंतु फळे खाण्याची एक निश्चित वेळ देखील आहे. अनेक फळे सकाळी आणि काही संध्याकाळी खाल्ल्याने फायद्याऐवजी हानी होऊ शकते. आयुर्वेदानुसार जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी सूर्यास्तापूर्वी फळे खावीत. चला तर, याची कारणे तपशीलवार जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
आपण संध्याकाळी फळे का खाऊ नये?
आयुर्वेदानुसार, संध्याकाळी फळे खाल्ल्याने झोपेच्या पद्धतीवर परिणाम होतो, याशिवाय ते पचन प्रक्रियेत देखील व्यत्यय आणू शकते. म्हणूनच पूर्वीच्या काळी लोक सूर्यास्तानंतर फळांचे सेवन करत नव्हते. आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी संध्याकाळी फळांचे सेवन करू नये. बहुतेक फळांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. ते रक्तातील साखरेची पातळी देखील वाढवू शकते.
रात्री कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ टाळावे
आपले चयापचय देखील सूर्यास्तानंतर नैसर्गिकरित्या मंदावते, ज्यामुळे कार्बोहायड्रेट्स पचवणे कठीण होते. हेच कारण आहे की रात्रीच्या वेळी हलके जेवण आणि कार्बचे सेवन कमी करणे उचित आहे. फळांमधून जास्तीत जास्त लाभ आणि पोषक मिळवण्यासाठी, ते योग्य वेळी सेवन केले पाहिजे. याशिवाय अशी अनेक फळे आहेत, जी चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतात.
फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?
आहारतज्ज्ञ म्हणतात की सर्व फळांचे वैशिष्ट्य आणि गुणधर्म वेगवेगळे असतात. म्हणूनच त्यांच्या गुणधर्मांच्या आधारावर त्यांचे सेवन केले पाहिजे. सकाळी रिकाम्या पोटी फळे खाणे सर्वात फायदेशीर ठरू शकते. जेव्हा आपण रात्री रिकाम्या पोटी सुमारे 10 तासांनंतर उठतो, तेव्हा शरीराला पोषक तत्वांची गरज सर्वाधिक असते. सकाळी निरोगी आहार घेतल्याने पोषक घटकांचे शोषण चांगले होऊ शकते, ते चयापचय दृष्टीने देखील फायदेशीर मानले जाते. फळांचे सेवन जेवणासोबतही करता येते. फळाच्या स्वभावानुसार त्याच्या वापराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
‘अशी’ चूक टाळा
आहारतज्ञ म्हणतात की फळे नेहमी नुसती खावीत. बऱ्याचदा आपण सर्व दुग्धजन्य पदार्थांसह काही फळे खातो, काहीवेळा असे करणे आरोग्यासाठी अधिक हानिकारक ठरू शकते. दुधासह काही फळांचे सेवन केल्याने शरीरातील विषारी द्रव्ये वाढू शकतात. फळांचे अयोग्य पचन आणि पोषक घटकांचे कमी शोषण यामुळे या प्रकारची समस्या उद्भवू शकते. यामुळेच फळे नुसतीच खावीत.