कलम १४४ मोडणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम १४४ लागू केले आहे. तसेच राज्य लॉकडाऊन केले आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला काही ठिकाणी गंभीरपणे घेण्यात येत नसल्याचे चित्र आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर गर्दी करू नका अन्यथा कायदा कडक करावा लागेल असे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी कायदा मोडणाऱ्यांना तंबी दिली आहे. यावेळी बोलताना, “कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका”.
दुसरीकडे करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक परिस्थिती गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव आपल्याला आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव आपल्याला आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. लोक ऐकत नसल्याने संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.