तिरूमला – भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान मानले जात असलेल्या तिरूपती बालाजी मंदिरात भाविकांकडून एका दिवसात 1 कोटीपेक्षा जास्त किंमतीचे दान दिले गेले आहे.
करोनामुळे बसविण्यात आलेला लॉकडाउन मागे घेतला गेल्यानंतर शनिवारी एकाच दिवसात 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम दान म्हणून मिळाली आहे.
तिरुपती देवस्थान करोनाच्या धोक्यामुळे 25 मार्चपासून बंद होते. भाविकांसाठी मंदिर पुन्हा खुले करण्यात आले होते. देवस्थानच्या हुंडीमध्ये भाविकांनी एका दिवसात प्रथमच 1 कोटी रुपये दान दिले. गेल्या शनिवारी 13 हजार 486 भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.
साधारणपणे दर महिन्याला रोख आणि हुंडीद्वारे सुमारे 200 कोटी रुपयांचे दान मिळत असते. देशातील सर्व मंदिरांच्या तुलनेत या मंदिराला सर्वाधिक रोख, दागिने आणि इतर देणग्या मिळतात.