कोल्हापूर : महापुरामुळे कोल्हापूर शहरामधील पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी व नागरिकांच्या घराच्या पुनर्वसनासाठी 315 कोटी रुपयांचा मदतनिधी मिळावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी कली आहे. याबाबत त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नागरिकांच्या घरांची पडझड झाली असून शहरातील पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे. महापुरामुळे कोल्हापूर शहरात झालेल्या नुकसानाची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिली.
रस्त्यांची दुरूस्ती व नागरिकांना सहाय्य देण्यासाठी 315 कोटी निधी देण्याची मागणी केली. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांचे पुनर्वसन व रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी लवकरच बैठक घेऊन मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, विज्ञान मुंडे, सुरेश चव्हाण व उदय जाधव उपस्थित होते.