नवी दिल्ली – करोनाचा धोका संपुष्टात आला, प्रवासबंदी उठवली गेली व लॉकडाऊनही संपुष्टात आले तरच देशांतर्गत क्रिकेट सुरू करता येईल, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे.
बुधवारपासून इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाल्याने क्रिकेट खेळत असलेल्या सर्व देशांना दिलासा मिळाला आहे. देशात करोनाचा धोका अद्याप कायम आहे तसेच सीमाबंदी व प्रवासबंदीही काही राज्यांनी कायम ठेवली आहे. अशा स्थितीत सामने सुरू झाले तर खेळाडूंना विविध ठिकाणी प्रवास करणे शक्य होणार नाही, त्यामुळे सध्यातही परिस्थितीचा केवळ आढावा घेतला जात आहे, असेही गांगुली यांनी सांगितले.