कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्ष्यांची सत्ता असताना वारंवार होणाऱ्या संपामुळे वर्षाला 75 लाख मनुष्यबळ दिवस वाया जात होते. आता हे प्रमाण शून्यावर आले असल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिखर परिषदेला ममता बॅनर्जी यांनी संबोधित केले.
त्यांनी सांगितले की आता देशातील उद्योगाबरोबरच परदेशातील उद्योजक पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. या समारंभाला अदानी उद्योग समूहाचे गौतम अदानी उपस्थित होते. त्यांनी यावेळी पश्चिम बंगालमध्ये 10 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे घोषणा केली. पश्चिम बंगालचा विकास करण्यासाठी राज्य सरकार पायाभूत सुविधा, शिक्षण, सामाजिक सुरक्षितता, कौशल्य विकास या विषयावर आगामी काळात भर देणार आहे. त्यामुळे देशातील बऱ्याच उद्योगानी पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली असल्याचे त्यांनी सांगितले.