नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशांतर्गत उड्डाणांमध्ये 10 टक्के वाढ केली याने अनलॉकनंतर विमान वाहतूक उद्योगाने मोठी झेप घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आता विमान सेवा 70% वरुन 80% झाली आहे. भारतीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे की, एअरलाइंस आपल्या प्री-कोविड कॅपेसिटीच्या तुलनेत आता 80% फ्लाइट्स ऑपरेट करू शकतील.
याआधी 25 मे रोजी फक्त 30 हजार लोकांनी हवाई प्रवास केला होता. 30 नोव्हेंबरला हा आकडा 2.52 लाखांवर पोहचला. हा मागील महिन्यातील एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. यामुळेच विमानांची प्रवासी क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशांतर्गत प्रवास करणाऱ्यां प्रवाशांची संख्या सतत वाढत आहे. यामुळेच केंद्र सरकारने विमान कंपन्यांना 70% क्षमतेसह उड्डाण घेण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी मंत्रालयाने जूनमध्ये उड्डाणांची संख्या 45% वाढवण्याची परवानगी दिली होती.
2 सप्टेंबरला ही मर्यादा वाढून 60% करण्यात आली. याशिवाय मंत्रालयाने ऑगस्टच्या अखेरपर्यंत एअरलाइन कंपन्यांसाठी अनेक सवलतींची घोषणा केली. यात प्रवाशांना जेवण आणि इतर सवलतींचा समावेश आहे. लॉकडाउननंतर 25 मेपासून देशांतर्गत प्रवासाची सुरुवात झाली होती. मात्र, आता हा उद्योग पूर्ववत क्षमतेने लवकरच कार्यरत दिसेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.