नवी दिल्ली – देश मंदीच्या वाटेवर असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंदीतून सावरण्यासाठी आरबीआयने केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचा निधी देण्याच ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
राहुल गांधी म्हणाले कि, स्वतः निर्माण केलेल्या आर्थिक संकटातून मार्ग कसा काढायचा? याबाबत पंतप्रधान आणि अर्थमंत्री अजाण आहेत. आरबीआयकडून चोरी करुन काही फायदा होणार नाही. हे म्हणजे दवाखान्यातून मलमपट्टी चोरी करुन गोळी लागलेल्या जखमेवर लावण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
PM & FM are clueless about how to solve their self created economic disaster.
Stealing from RBI won’t work – it’s like stealing a Band-Aid from the dispensary & sticking it on a gunshot wound. #RBILooted https://t.co/P7vEzWvTY3
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 27, 2019
दरम्यान, केंद्र सरकारकडून आरबीआयकडे पैशाची मागणी करण्यात अली होती. त्या पार्श्वभूमीवर आज आरबीआयच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक झाली. या बैठकीत बिमल जाळं समितीच्या शिफारसी मंजूर करत आरबीआयच्या निधीतून १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.