मुंबई – राज्यातील महा आघाडी सरकारवर भाजप नेते आशिष शेलार नेहमीच टीका करीत असतात. यावेळीही त्यांनी ट्विट करत मविआ सरकारवर हल्ला केला आहे. सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय? असा सवालही त्यांनी ट्विट करत विचारला आहे.
◆सरकार विरोधात लिहिले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडला…
◆मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारले
◆आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदांना निलंबित केले
1/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 6, 2021
काय आहे आशिष शेलार यांचे ट्विट
भाजपचे आमदार आशिष शेलार हे विरोधी पक्षावर नेहमीच निशाण साधून असतात. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अनागोंदी कारभारावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात फक्त काय द्यायचे राज्य आहे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. सरकार विरोधात लिहिले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यात आला. मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारले. आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदारांना निलंबित केले, असं शेलार यांनी म्हटलं आहे.
◆अनिल देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावले..
राज्यात फक्त आणि फक्त काय”द्यायचे” राज्य आहे का?
तिघाडी मिळून,
सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय?
3/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 6, 2021