नवी दिल्ली : पती-पत्नीचे नाते खूप खास असते. या नात्यात तिसर्या व्यक्तीच्या येण्याला वाव नाही. पण, अनेकदा असे घडते की लोक पती-पत्नीमधील भांडण चुकीच्या पद्धतीने घेतात. मात्र असेही बोलले जाते की त्यांच्यातील भांडणामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होते. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे. पती-पत्नीने एकमेकांशी भांडायचे नाही, त्याने नाते कमकुवत होते, असे वडीलधारी मंडळी सांगत असले तरी वास्तव तसे नाही.
रिअल लाईफमध्ये जर तुमचे आणि तुमच्या पार्टनरमध्ये भांडण झाले तर तुमचे नाते अधिक घट्ट होते. इतकंच नाही तर अनेक वेळा भांडण झाल्यावर आपापसात अधिक प्रेम वाढतं. मात्र हे भांडण अति प्रमाणात वाढू नये हे लक्षात ठेवा. कारण जास्त वेळा भांडण झाल्यामुळे गोष्टी बिघडू शकतात.
* एकमेकांची काळजी दिसते
भांडणाच्या वेळी आपण एकमेकांना सांगतो की तुला माझी काळजी नाही. पण, जेव्हा तुमचा जोडीदार भांडणानंतर तुमची काळजी घेतो, तेव्हा तुमचे हृदयही विरघळते.
* खदखद बाहेर येते
अनेकवेळा आपण काही शब्द रागाच्या भरात बोलतो, मग कदाचित आपल्याला सामान्य असताना बोलता येत नाही. पती-पत्नीच्या नात्यात भांडण होऊ नये म्हणून लोक अनेक गोष्टी मनातच ठेवतात. मात्र यामुळे एकमेकांबद्दल कटुता निर्माण होऊन गोष्टी बिघडतात. भांडणाच्या वेळी मनातील गोष्टी किंवा खदखद बाहेर आल्यामुळे त्याचे स्पष्टीकरण मिळते तसेच त्याबद्दल माफीही मागितली जाऊ शकते. त्यामुळे नाते घट्ट होते.
* विश्वास वाढतो
जेव्हा पती-पत्नीमध्ये भांडण होते आणि राग शांत झाल्यावर, जेव्हा ते एकमेकांशी बोलतात आणि गोष्टी सोडवतात तेव्हा त्यांच्यात विश्वास निर्माण होतो.
* भांडणातच खरे वर्तन समोर येते
माणसाची खरी वागणूक भांडताना समोर येते. यामुळे मनातील भावना देखील बाहेर येतात, ज्यामुळे पती-पत्नीमधील नाते मजबूत होते.