नवी दिल्ली – राज्यभरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत १६ जणांना, तर पुण्यात दोघांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे राज्यातील संख्या ३२० झाली आहे.
यातच गूगलवर हाच प्रश्न अनेकांनी विचारलेला दिसतो. खरंच पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो का? या प्रश्नच उत्तर लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनमध्ये एपिडेमोलॉजिस्ट कल्पना सबापैथी यांनी वृत्त माध्यमांना सांगितलं की, संसर्ग हा एका व्हायरल कणामुळे नाही तर हजारो किंवा लाखो पार्टिकल्सच्या संपर्कात आल्यानं होतो. त्यामुळे ग्रासनलीतील मोजक्याच व्हायरसची स्वच्छता करून त्याचा फारसा परिणाम होणार नाही. तसेच नाकामार्फत व्हायरस श्वासनलिकेत नाही पोहोचले तरीदेखील शरीराच्या इतर भागातून ते शरीरात जाऊ शकता. डोळ्यांना हात लावूनही व्हायरस शरीरात जाऊ शकतात.असं त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आपल्याला कोरोनाव्हायरस होऊ नये, यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. सोशल मीडियावर या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काही टीप्स व्हायरल होत आहेत. यामध्ये बहुतेक टिप्स या चुकीच्या आहेत. असं ते म्हणाले आहे.