मुंबई – राज्यात सध्या फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोनच मंत्री आहे. अजूनही राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडला नसल्याने दोनच मंत्री संपूर्ण कारभार सांभाळत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे सतत दिल्ली दौरे सुरु आहेत. याशिवाय महाराष्ट्र दौरा, उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभा, बैठका यामध्ये एकनाथ शिंदे सतत व्यस्त आहेत. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यांना थकवा जाणवू लागला आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी होणाऱ्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात सभा घेत आहेत, तसंच त्या भागातील आढावा घेत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. यासोबत आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील शिवसैनिकांसोबत संवाद साधत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे हे दौरे राजकीय दृष्टीकोनातूनही महत्त्वाचे आहेत. मात्र, आता सततच्या दौऱ्यामुळे शिंदे यांना थकवा जाणवत आहे.
चंद्रपूर : केंद्रीय पथकाने केली नुकसानग्रस्त गावांची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुरुवारच्या सर्व प्रशासकिय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. सततचे अतिव्यस्त दौरे आणि पहाटे पर्यंतच्या सभांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत आहे. त्यामुळे, डॅाक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सक्त आरामाचा सल्ला दिला आहे.
वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स; पती-पत्नीची समोरासमोर बसून होणार चौकशी?