मुळशी -आपण एक काम करू, आता जर आपली आई, बहिण, भाऊ, नवरा, बायको ज्या कंपनीत काम करत असतील तर त्यांना हात जोडून विनंती करा की आम्हाला तुमची कंपनी पाहू द्या. आता कंपनी लोकांनी आतमध्ये जाऊन पाहिली पाहिजे.
प्रत्येक मुळशीतल्या सरपंच, उपसरपंचाला विनंती करतो, ज्या कंपन्यांच्या आत आणि पाहा आपले भाऊबंध कसे काम करीत आहेत. ते पहा. नाहीतर असेच जळून मरतील महिन्याभरांनी, वर्षांनी… आणि आपण हा तमाशा पाहत बसायचा का?, असा उद्विग्न सवाल सिने अभिनेता प्रवीण तरडे यांनी उपस्थित केला.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तरडे बोलत होते. 40 बाय 40च्या ठोकळ्यात 41 माणसे काम करतात का कधी? म्हणजे 20 माणसे वाचली यात आनंद मानायचा की 17 जण गेल्याचे दू:ख करायचे. 40 बाय 40च्या ठोकळ्यात 10-12 केमिकलच्या मशीन्स आहेत आणि 41 माणसे कामाला कशी?
अपघात सर्व ठिकाणी होतात हो! औद्योगिक क्षेत्रात पण अपघात झाल्यावर माणसे वाचली पाहिजेत. अग्निशमन दलाची माणसे आली तेव्हा जागा नव्हती, ही किती मोठी शोकांतिका म्हणावी.