मुंबई : वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या काळात आज देश प्रगती पथावर असल्याचे दिसत आहे. मात्र असे असले तरी लैंगिक शिक्षणाची कमतरता असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे. यामुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता नाही हेच समोर येते. याबाबत अनेक गैरसमज अजुनही कायम आहेत. खरंतर, चुकीच्या माहितीमुळे स्त्रियांना गर्भनिरोधक गोळ्यांबद्दलही अनेक गैरसमज आहे. ज्याने शरीरावर मोठा वाईट परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
गर्भनिरोधक गोळ्यांच्या गैरसमजांमुळे पुरुष व स्त्रिया गर्भनिरोधक पद्धतीचा वापर टाळतात. यामुळे नको असलेली गर्भधारणा आणि महिलांना शारीरिक आणि मानसिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गर्भनिरोधक गोळ्या वापरण्याची पद्धत….
जर या गोळ्या योग्यरित्या वापरल्या तर याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या अत्यंत प्रभावी आणि फायदेशीर आहेत. यासाठी दररोज एक गोळी घ्यावी लागते. जर तुम्ही एखादी गोळी चुकवली तर त्याचा फार काही परिणाम शरीरावर होत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, गर्भनिरोधक गोळ्या घेताना महिलांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल चुकीची माहिती
-
सर्व गर्भनिरोधक गोळ्यामुळे वजन वाढत : गर्भनिरोधक गोळ्या खाल्यामुळे वजन वाढतं अशी अनेकांची समज आहे. पण नवीन पद्धतीने बनवलेल्या गोळ्या खाल्ल्याने वजन वाढत नाही, तर त्याचे अनेक चांगले फायदे आहेत. पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम (पीसीओएस) असलेल्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी या गोळ्या काम करतात.
-
गर्भनिरोधक गोळ्यामुळे केसांची वाढ थांबते : गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये प्रोजेस्टेरॉन वेगवेगळ्या प्रमाणात तयार होतो, ज्यामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होतं. पण यामुळे केसांची वाढ थांबत नाही.
-
गोळ्या चुकवणं ठीक आहे का? : सायकल दरम्यान गोळ्या न खाल्याने अवांछित गर्भधारणा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही गोळ्या चुकवल्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.