नवी दिल्ली: देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर देशात वातावरण पेटलं आहे. अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यांवर उतरून या कायद्याला विरोध करत आहेत. या विधेयकावरुन देशातलं वातावरण पेटल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अल्पसंख्यांक शरणार्थींना आमचं सरकार नक्कीच नागरिकत्व देईल. विरोधकांना राजकारण करायचं असेल, तर त्यांनी जरुर करावं. भाजपा आणि मोदी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे शहांच्या या वक्तव्यावरून तरी भाजप सरकार हे नागरिकत्व सुधारणा कायद्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील विरोध बघता हा कायदा मागे घ्यावा लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. तसेच या कायद्यात काही बदल होऊ शकतात असाही अर्थ काढला जात होता.
Home Minister Amit Shah in Delhi on #CitizenshipAmendmentAct: Aapko jo rajnitik virodh karna hai wo karo, Bharatiya Janata Party ki Modi sarkar firm hai. Ye sabhi sharanarthiyo ko nagrikata milegi, vo Bharat ke nagrik banenge aur samman ke sath duniya me rahenge. pic.twitter.com/JKyTbDMx4K
— ANI (@ANI) December 17, 2019
दरम्यान, काही तासांपूर्वीच शहा म्हणाले होते की,’सर्व विरोधक लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हे समजावण्याचा प्रयत्न केला की, सुधारित नागरिकत्व कायद्याद्वारे कोणत्याही अल्पसंख्यांक व्यक्तीचे नागरिकत्व परत घेण्यात येणार नाही. या कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही’.