मुंबई – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या काही दिवसांपासून घटत असल्याचे चित्र आहे. मात्र घटलेल्या रुग्णसंख्येमागे कमी करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या असल्याची शक्यता काही माध्यमांद्वारे वर्तविण्यात आली आहे. याबाबतच्या वृत्तातून राज्यातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी चाचण्या व रुग्ण सापडण्याचे गुणोत्तर अद्यापही २० टक्के इतके कायम असल्याचंही समोर आलं आहे.
दरम्यान, या आकडेवारीचा दाखला देत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी, ‘कोरोना बाधितांची संख्या कमी दाखवण्यासाठी चाचण्या कमी करण्याचा जीवघेणा खेळ राज्य सरकार सुरूवातीपासूनच खेळत आहे’ असा गंभीर आरोप लगावला आहे.
भातखळकर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. ट्विटद्वारे त्यांनी राज्य सरकारला कोरोना चाचण्या कमी केल्याबाबत चांगलंच सुनावलं आहे. ट्विटद्वारे त्यांनी, ‘राज्य सरकारने चाचण्याच बंद कराव्यात म्हणजे रुग्णांची संख्या शून्य होईल व मुख्यमंत्री ब्रम्हांडात बेस्ट ठरतील.’ असा टोलाही लगावला आहे.
कोरोना बाधितांची संख्या कमी दाखवण्यासाठी चाचण्यात कमी करण्याचा जीवघेणा खेळ राज्य सरकार सुरूवातीपासूनच खेळत आहे… मात्र चाचण्या व रुग्णांचे गुणोत्तर २०% आजही कायम आहे… राज्य सरकारने चाचण्याच बंद कराव्यात म्हणजे रुग्णांची संख्या शून्य होईल व मुख्यमंत्री ब्रम्हांडात बेस्ट ठरतील. pic.twitter.com/CrYjcttpGG
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 8, 2020