पुणे – सध्या सर्वत्र पावसाळ्याचे वातावरण असल्यामुळे अनके आजरांची लागण होण्याची शक्त्यात आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये यावेळी कमी किंवा जास्त पाऊस पडत आहे. वातावरणातील या बदलांमुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला हे आजार उद्भवतात. पण यंदा कोरोनाच्या माहामारीशी देश लढत असल्यामुळे सगळयांमध्येच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, आता घाबरण्याचे काही एक कारण उरले नसून, या आजारांसाठी आम्ही काही रामबाण उपाय तुम्हाला सांगणार आहोत.
१) पावसात भिजल्यानंतर लगेचच अंगातले कपडे बदला. कारण ओल्या कपड्यांमुळे तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता असते. त्यासाठी पावसात भिजल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करा. पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओले शुज पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.
२) पावसाळ्यात जास्त भिजला असाल तर आपण कोमट पाण्याने अंघोळ करावी. नंतर आपल्या संपूर्ण शरीराला विशेषतः आपल्या केसांना वाळवून घ्यावं जेणे करून आपण आजारी पडू नये. पावसाळ्यात केस ओले झाल्यामुळे डोक्यात संसर्गाचा धोका वाढून जातो. जर आपण आपले केस स्वच्छ धुऊन वाळवाल तर संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.
३) पावसाळ्यात थंडावा असतो. सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे या हंगामात व्हायरल आणि बेक्टेरियल संसर्गाचा धोका वाढून जातो. या हंगामात आपण आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी गरम अन्न आणि गरम पेये घ्या.
४) पावसाळ्यात लोकं घरात असो किंवा बाहेर चहा आणि भजी खावंसं वाटतं. तेच काही लोकं फास्टफूड खाण्यास प्राधान्य देतात. तर या हंगामात बाहेरचे खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने आपले पोट खराब होऊ शकत. जर आपण भिजला आहात तर असे पदार्थ खाणं टाळावं.