मुंबई : राजय्त सध्या लसीच्या पुरवठ्या अभावी लसीकरण केंद्र बंद करण्यात येत आहेत. त्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी विरोधक आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लसीच्या तुटवड्यावरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असे चित्र निर्माण झालेले असताना त्यावर लगेच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रापेक्षा जवळपास दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुऱवठा राज्याला करण्यात आला आहे, असा पलटवार केला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
आपल्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या #pcmc ने काढलेल्या या पत्रावर तरी भाजपने विश्वास ठेवावा आणि महाराष्ट्राला पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी! केंद्र सरकार याबाबत सहकार्य करेल, असा विश्वास आहे.@PMOIndia @drharshvardhan#MaharashtraNeedsVaccine pic.twitter.com/pE0zVxzPwM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 8, 2021
“केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली, हे सांगायची आता वेळ नाही. योग्य वेळी ते जनतेला नक्की कळेल. सध्या राज्याला संकटातून बाहेर काढायची वेळ आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावतील, ही अपेक्षा. विरोधी पक्षाला विनंती आहे की, किमान संकट काळात तरी राजकारण करू नका. सरकार पडणार नाहीच पण ते पडावं यासाठी आपण जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत. संकटकाळी जनतेसोबत, सरकारसोबत उभं रहावं. महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील!” असे रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. तसेच, “लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत.
लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत. केंद्र सरकारच्या गृहितकानुसार वेस्ट रेट हा १०% असू शकतो,पण आपण तो अवघा ३% ठेवला. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा.#MaharashtraNeedsVaccine
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 8, 2021
राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा”, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर नाव न घेता निशाणा साधला. पुढे बोलताना त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उदाहरण दिले. करोना लसीचा साठा संपल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९ तारखेला लसीकरण बंद ठेवले आहे.
त्यावरुन, “किमान आपल्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या महानगरपालिकेने काढलेल्या या पत्रावर तरी भाजपाने विश्वास ठेवावा आणि महाराष्ट्राला पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी!” असं पवार म्हणालेत. तसेच, केंद्राकडून लसींचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? असे प्रश्नही त्यांनी विरोधकांना विचारले.
दरम्यान, करोना लसीच्या तुटवड्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असं चित्र निर्माण झाले असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा जाणवत आहे. पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास लसीकरण मोहीम ठप्प पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.