आळंदी – महाराष्ट्र दिनानिमित्त येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्राथमिक विद्यामंदिर, माध्यमिक विद्यालय व कॉलेज मधील एस. एस. सी. / एच. एस. सी. बोर्ड परीक्षेमध्ये तसेच स्कॉलरशिप व एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तत्पूर्वी विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर तसेच उपस्थित मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत व विद्यालयाचे पर्यवेक्षक अशोक बनकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे (अध्यक्ष, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू), बंडूनाना भाबड (उपाध्यक्ष, लोक शिक्षण मंडळ, सिन्नर, नाशिक), संतोष दिघे (उद्योजक), गोरख शेळके (पी. एस. आय. गोरेगाव, मुंबई), राजेंद्र शेळके नाशिक. सुनीताताई रंधवे (नगरसेविका आळंदी नगरपरिषद), संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दिपक पाटील, विश्वस्त प्रकाश काळे (अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती), सदस्य अनिल वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप काळे शिक्षक, प्रतिनिधी अल्लाबाक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे म्हणाले, शाळा ही केवळ विद्यार्थ्यांना यंत्र बनवत नाही तर योग्य शिक्षण देऊन सुसंस्कारीत करते. श्री ज्ञानेश्वर विद्यालय ही संस्था संतभूमीत विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य करत आहे. ज्ञानदानाचे कार्य व संस्कार या भारत देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे आहे. मुलांना सुसंस्कृत व स्वावलंबी बनवायचे कार्य हे विद्यालय करते. म्हणूनच या शाळेतील विद्यार्थी गुणवंत यादीत चमकतात. ज्ञानदानाचा वेल असाच बहरत राहो, अशी प्रार्थन त्यांनी माऊली आणि तुकोबारायांकडे केली.
संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत तसेच शालाबाह्य परीक्षेत विद्यार्थ्यांनी जे प्राविण्य मिळवले त्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व अध्यापकांचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास शिवले व योगेश मठपती यांनी केले. कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता माऊलीच्या पसायदानाने झाली.