प्रचारी कार्यकर्त्यांना 295 रूपयात बिर्याणी, तर 180 रुपयांची राईसप्लेट
हे असणार निवडणूक निर्णय अधिकारी
नगर शहर-श्रीनिवास अर्जुन,पारनेर-सुधाकर भोसले,कोपरगाव-राहुल मुंडके,संगमनेर-शशिकांत मंगरूळे,कर्जत-जामखेड.अर्चना नष्टे,श्रीगोंदे-अजय मोरे,राहुरी-महेश पाटील,श्रीरामपूर-अनिल पवार.राहाता-गोविंद शिंदे,अकोले-उदय किसवे,शेवगाव-पाथर्डी-देवदत्त केकाण,नेवासे -शाहुराज मोरे,
नगर – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही शक्यता लक्षात गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली आहे.आचारसंहिता कक्ष,मिडिया सेंटर,तसेच आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी सर्व यंत्रणेवर नजर ठेवणारी पथके तयार करण्यात आली आहेत.
मतदार याद्या अद्यावत करणे,मतदान यंत्रांची तपासणी ही प्रमुख काही कामे आटोपल्यानंतर निवडणूक शाखेने प्रत्यक्ष निवडणुकीसंदर्भातील कामे हाती घेतली आहेत.जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कामकाज पाहणार आहे.जिल्ह्यात एकूण 3722 मतदान केंद्र असून यासाठी सुमारे 28 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.त्यादृष्टीने निवडणूक विभागाने जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली आहे.आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.
संबंधीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमून ती निवडणूक कामकाजावर लक्ष ठेवणार आहे.जिल्ह्यात एकूण 375 क्षेत्रीय अधिकारी,38 पथके,36 स्टॅटिक सर्व्हिलान्स टीम अर्थात एसएसटी,12 व्हीडिओ सर्व्हिलान्स टीम,12 अकाऊंट टीम अशा सर्वांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. उमेदवार व राजकीय पक्षाच्या खर्चावर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारसंघनिहाय खर्च नियंत्रण समिती नियुक्ती केली आहे.खर्च नियंत्रण समितीचेही प्रत्येक उमेदवाराच्या खर्चावर बारीक लक्ष असते.त्यासाठी नेमलेल्या विविध पथकांशी कसा समन्वय करायचा,याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
31 ऑगस्ट रोजी अंतिम मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला.31 ऑगस्ट रोली अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली.त्यानुसार मतदारांची संख्या 34 लाख 69 हजार 392 इतकी आहे.यात महिला मतदार 16 लाख 63 हजार 385,पुरूष मतदार 18 लाख 5 हजार 855,तर अन्य 156 मतदारांचा समावेश आहे.मतदारांच्या मदतीसाठी डायल 1950 सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
निवडणुक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी चहापान व जेवणावळीसाठी वापरलेल्या विविध पदार्थांचे दर निश्चित केले आहेत.या दराबाबतची माहिती देण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस,भारतीय जनता पार्टी,बहुजन समाज पार्टी,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,शिवसेना,भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली.
या बैठकीला सर्व पक्षाचे पवदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारांना निवडणुकीचा खर्च सादर करणे बंधनकारक आहे.चहाचा दर सहा,तर कॉफिचा दर 10,पाणी बॉटल 17,वडापाव एक प्लेट 15,भजी 20,दोन समोसे 25,भेळ 25,बिर्याणी 205 रूपये असा दर आहे. प्रचारासाठी तयार केलेल्या प्लेक्सचा दर प्रती स्केअर फू ट 34 रूपये असणार आहे.स्काफर् 13 रूपये एक हजार पोस्टरसाठी 4 हजार 250 रूपये,टी शर्ट 135,वूलन शाल 800 रूपये,तीन मीटर फे ट्याला 190 रूपये खर्च आकारला जाणार आहे. दर दिवसासाठी 1 जीपला 1 हजार 900,ट्रॅक्स 3 हजार 50,बोलेरो 4 हजार 250,स्वीप्ट डिझायर गाडीसाठी 3 हजार 750 रूपये दर निश्चित केला आहे.