भिगवण-आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर अडकून पडलेल्या ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप अकोले (ता. इंदापूर) येथे तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. करोनो या विषाणूजन्य रोगामुळे आलेल्या बंधनांमुळे मजूर वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
ऊसतोड कामगारांना हंगाम संपल्याने त्यांना घरी जात येत नसल्याने अकोले येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोड कामगार अडकून पडले आहेत. या कामगारांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तहसीलदार सोनाली मेटकरी आणि कर्मचारी यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांची खाण्याची व्यवस्था करून प्रश्न मार्गी लावला आहे. याप्रसंगी तलाठी विनायक कुलकर्णी, शिवाजी खोसे, महादेव भारती, ग्रामसेवक सचिन पवार, पोलीस पाटील सतीश सुबनावळ आदी उपस्थित होते.