मंचर- पिंपळगांव-खडकी (ता. आंबेगाव) येथे गोरगरीब आणि हातावर पोट असणारे बारा बलुतेदार व भूमिहीन गरजू अशा सुमारे पंधराशे कुटुंबांना मोफत फळभाज्यांचे वाटप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले, अशी माहिती तालुका संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिली.
तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी शेतकऱ्यांकडून तरकारी फळभाज्या विकत घेऊन या कुटुंबांना वाटण्यात आल्या. सरपंच अश्विनी बांगर, उपसरपंच रशिद इनामदार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य यावेळी लाभले. परिसरातील शेतकरी योग्य बाजारभावामध्ये भाजीपाल्याचा पुरवठा करत आहेत. करोना विषाणूच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गरीब गरजू लोकांसाठी हा अभिनव उपक्रम सुरू केल्याचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी सांगितले.