फलटण – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे फलटण येथे जोरदार स्वागत करण्यात आले. फलटण येथील विमानतळ येथे दोन दिवस पालखी मुक्कामी असते.
त्यामूळे लाखो वारकरी मुक्कामी असतात. त्यांची शहरातील अनेक मंडळे, सेवा भावी संस्था मदत करत असतात. विविध प्रकारच्या सेवा पुरवित असतात.
त्यातील शहराच्या मध्यभगी असलेले सैफ़ भाई शेख मित्र मंडळ मागील ३० वर्षापासून वारकऱ्यांची सेवा करत आहे. त्यांना सकाळची न्याहारी , दुपारचे भोजन, संध्याकाळी चहा वाटप करण्याचे काम करत आहे.
वारकरी यांची सेवा म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. वर्षातील हे दोन दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचे असतात. यावेळी आम्हला सेवा करण्याची संधी मिळते , माणसाशी माणसाने माणसं सम वागावे, हे ह्यातून शिकण्यास मिळते.. असे मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. बादशाही मजीद रजवाड़ा चौक राम मंदिर ह्या ठिकाणी सेवा पुरविण्याचे काम करत आहेत.
त्यापूर्वी शनिवारी पहाटे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची पूजा, अभिषेक आणि आरती पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. श्रीमंत शितोळे सरकारच्या वतीने माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. दिवसभर दिंड्यांमधून टाळ मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष सुरू होता. संपूर्ण फलटण नगरी या गजराने दुमदुमून गेली होती. फलटण, बारामती तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील लाखो भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
फलटणमधील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सोहळा आज (दि. ३ जुलै) बरड मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.