नवी दिल्ली – महाराष्ट्र रराज्यातील सुर्डी ग्राम पंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या गैरसरकारी संस्थेला आणि दै. ॲग्रोवनला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’नं आज सन्मानित करण्यात आले. या गावांनी जल व्यवस्थापनातं भरीव कामगिरी केली आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं.
देशात सुरू असलेल्या जल संरक्षण कार्यक्रमात समाजाच्या सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घेतला, तर भारत पुन्हा एकदा ‘सुजलाम सुफलाम’ होईल, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं. भारतीय संस्कृतीत पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या जीवनदायी नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दापोली येथील नारगोली धरण पुनरूज्जीववन मोहीम यशस्वी करुन येथील नगरंपचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात केली त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण, खोलीकरण केले. ११ श्रेणीत ५७ पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं.जलसमृद्ध भारताचं स्वप्न साकारण्यासाठी सरकार राबवत असलेल्या जलशक्ति अभियानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, बिश्वेश्वर टुडू आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.