चिंबळी – करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला. तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून कुरूळी येथील तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव सोनवणे, संत तुकाराम सहकारी साखर कारखानाच्या संचालिका ताराबाई सोनवणे, आशिष मुऱ्हे, विशाल सोनवणे, दीपक डोंगरे, रामनाथ सोनवणे, नाना जैद, सागर मुऱ्हे आदी मान्यवरांच्या वतीने 700 गोरगरिबांना साखर, तेल, तांदूळ, आटा, मसाला, कांदे, बटाटे, साबण आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.