मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली या जोडीने प्रत्येक वेळी चाहत्यांना आणि क्रीडाप्रेमींना कपल गोल्स दिले आहेत. विविध प्रसंगी या जोडीने एकमेकांना साथ दिल्याचे पाहायला मिळाले आहे, पण आता म्हणे या जोडीच्या नात्यात दुरावा आला आहे. हा दुरावा नेमका का आणि कसा आला हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
अनुष्कानेच सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याची झलक सर्वांपुढे आणली. अनुष्का आणि विराट सध्या यूएईमध्ये आहेत. क्रिकेट टी 20 विश्वचषकासाठी ही जोडी सध्या तिथे पोहोचली आहे.
पाकिस्तानसोबतच्या टी20 सामन्यापूर्वीच्या वास्तव्यासाठी भारतीय क्रिकेट संघ तिथे पोहोचला आहे. जिथे विराट दुसऱ्याच बाल्कनीमध्ये दिसत असून, अनुष्काने त्याचे फोटो क्लिक केले आहेत.
विराट आणि अनुष्कामध्ये हा मजेशीर दुरावा असला तरीही या फोटोंतूनही त्यांच्या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमोर पाहायला मिळत आहे.
तिच्या या पोस्टला अनेक लाईक्स मिळाले आहेत. कित्येकांनी त्यावर कमेंटही केली आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीसुद्धा या पोस्टवर व्यक्त झाले असून, या फोटोची सर्वत्र चर्चा होत आहे.