नगर – जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंतीलगत फळ व इतर साहित्य विक्रेत्यांची अतिक्रमणे चार वेळा महापालिकेच्या अतिक्रम प्रतिबंधक पथकाने चार वेळा अतिक्रमण हटविली असली तरी ही अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झालेले आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली अतिक्रमणे हटविण्यात यावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्याशी चर्चा करूनही ही अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार इथापे यांच्याशी जिल्हा परिषदेमध्ये चर्चाही केली होती. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चार वेळा जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंतीलगत असलेली अतिक्रमणे हटविण्यात आली होती.
मात्र ही अतिक्रमणे परत जैसे थे झालेली आहेत. त्यामुळे महापालिका विभागाने ही अतिक्रमणे परत हटवावी, अशी मागणी आता होत आहे. या अतिक्रमणावर महापालिकेकडून कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह आता कर्मचाऱ्यांमधून होत आहेत. विशेष म्हणजे या अतिक्रमण धारक दुकानदारांकडून साहित्य व खाद्यवस्तुंची खरेदी व विक्री करताना काही कर्मचारी दिसून येत आहेत.