दावडी- खेड सेझबाधित 15 टक्के परतावा प्रश्न गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे सेझबाधित शेतकरी बांधवामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक कनेरसर येथे रविवारी (दि.25) कुलस्वामिनी मंगलकार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.30 वाजता आयोजित केली आहे. या बैठकीस कनेरसर, केंदूर, निमगाव, दावडी, गोसासी या गावातील सेझबाधित शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
सेझबाधितांच्या जमिनी संपादन करताना 15 टक्के परतावा पॅंकेजमध्ये देण्याचे मान्य केले होते;परंतु अद्यापपर्यंत ठोस निर्णय झालेला नाही. परताव्यापोटी मिळणारे 450 एकर जमीन व या जमिनीच्या विकसनासाठी 25 टक्के विकसनमूल्य असे 57 कोटी रक्कम शेतकऱ्यांची अडून पडलेली आहे, त्यामुळे हा प्रश्न आधिक गुंतागुंतीचा असून त्यासाठी अंतिम कृतीआराखडा तयार करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. बैठकीच्या आयोजनासाठी ऍड. सुनील लिमगुडे, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, विश्वास कदम, उत्तम कान्हुरकर, एकनाथ गोरडे, संतोष दौंडकर, काशिनाथ हजारे यांनी पुढाकार घेतला आहे.