तिरुअनंतपुरम – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत विविध राज्यांमध्ये पक्षाला मिळणारे यशापयश पक्षांतर्गत परिस्थितीवर परिणाम करणारे ठरणार आहे. भाजपला मधील निवडणुकांनंतर तिसऱ्या आघाडीची दिशाही निश्चित होऊ शकते. विधानसभा निवडणुकीचे वारे केरळमध्ये सुद्धा दिसून येत आहे. कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व असलेल्या या राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे.
यातच केरळमध्ये प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,’सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर संघटित हिंसाचाराचा आरोप करीत असा प्रकारचा कोणताही हिंसाचार भाजप खपवून घेणार नाही. असा इशारा त्यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले,मोदी यांनी येशू ख्रिस्ताला धोका देणारा त्यांचा धर्मदूत जुडास याच्याशी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा तुलना केली आहे. ते तुलना करतांना पुढे म्हणाले,’ जुडासने चांदीच्या किरकोळ तुकड्यांसाठी येशू ख्रिस्ताला धोका दिला. आता विजयन आणि डावी लोकशाही आघाडीही (एलडीएफ) सोन्याच्या काही तुकड्यांसाठी केरळची फसवणूक करीत आहे.’
तत्पूर्वी, या राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्लीसह देशभर मेट्रोचे जाळे उभे करण्यात तज्ज्ञ असलेले इंजिनियर ई. श्रीधरन अर्थात “द ग्रेट मेट्रोमॅन’ला भाजपाने आपल्या पक्षात घेत, त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे.