नीरा नदीपात्रात सोडले पाणी
लोणंद – वीर धरणातून मध्य रात्री नीरा नदी विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी नीरा नदीपात्रात सोडले आहे. या नदीपात्रावरील ब्रिटिशकालीन पालखीचा जूना पुल पाण्याखाली गेला आहे. तसेच प्रसिद्ध माऊली स्नानाच्या ठिकाणी असलेले दत्त मंदिर व दशक्रीया विधी घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.