मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. विरोधी पक्षातीन नेत्यांशिवाय भाजपतील काही लोकांना कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिंदे गटाचे नेतेही राज्यपाला यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याचमुळे आता राज्यपालांना लवकरात-लवकर केंद्रात पुन्हा बोलावून घ्या, अशी मागणी जोर धरू लागलू होती. अशातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.
सुषमा अंधारे म्हणाल्या,’नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या, ‘राज्यपाल हे जणूकाही हस्तक म्हणून वागत आहेत. असं राज्यपाल कोश्ययारी यांचं वागणं भाजपच्या अंगाशी येताना दिसत आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या अशा वागण्याची गच्छंती करायची आहे. पण, असं करताना आपला पक्ष कुठंही डॅमेज होणार नाही, याची काळजी भाजप घेताना दिसून येत आहे, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.