वाघोली- केसनंद ग्रामपंचायतीच्या आखाड्यात सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनलच्या मिलिंद हरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या सहा जागा निवडून आल्या आहेत. श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्याने व 6 जागा एका गटाच्या निवडून आल्याने केसनंद ग्रामपंचायतीवर ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनलचे वर्चस्व निर्माण केले आहे. ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर गावातील तरुणांनी विजयी उमेदवारांना डोक्यावर घेऊन त्यांची जंगी पदयात्रेद्वारे मिरवणूक काढली. या मिरवणुकीची हवेली तालुक्यात चर्चा होत आहे.
केसनंद निवडणुकीत एकूण पंधरापैकी 9 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनलचे सात सदस्य बिनविरोध निवडून आले असून पॅनलचे एकूण 13 सदस्यांची ग्रामपंचायतीवर वर्णी लागल्याचे पॅनल प्रमुख मिलिंद हरगुडे यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेत वाघोली गावचा समावेश झाल्यानंतर लगतच्या असणाऱ्या गावांना अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले. त्यातच लोकसंख्येने विस्तारलेल्या केसनंदने अल्पावधीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अटीतटीची झाली. संतोष हरगुडे, एस. पी. हरगुडे, तानाजी बांगर, तानाजी हरगुडे, प्रकाश जाधव, वाल्मीक आबा हरगुडे, शंकर वाबळे, राजेंद्र सावंत, पंडित सातव, सदाशिव तांबे, प्रणाली तांबे, शहाजी हरगुडे, शिवाजी पाटोळे, रहिम शेख, अलका सोनवणे, दिलीप रामचंद्र हरगुडे, माऊली हरगुडे आदींनी ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनलच्या बाजूने मोलाची कामगिरी केल्याचे पॅनलप्रमुख मिलिंद हरगुडे यांनी सांगितले.
यावेळी अनिल जाधव, शिवाजी शिंदे, विकास हरगुडे, विनोद नागरगोजे, सूरज हरगुडे, निलेश ढोरे, राहुल ढोरे, गणेश राणे, युवराज शिंदे, संजय झांबरे, ओमकार हरगुडे, प्रशांत हरगुडे, भरत वाबळे, अनिल पासलकर, संदीप ढोरे, मल्हारी भंडलकर, अनिल सातव, गणेश वाबळे, माणिक शिंदे, तुकाराम वाबळे, अमित येवले, गणेश गावडे, निळाराम हरगुडे, दीपक ढोरे, बाजीराव हरगुडे, सोनू हरगुडे, राजू जाधव, मल्हारी ढोरे, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.