पुणे : खडकवासला धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सध्यस्थितीत खडकवासला धरणातून नदीमध्ये 9 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. सध्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात मिळून 19.41 टीएमसी म्हणजे 67 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
खडकवासला धरणातून बुधवारी दुपारी 428 क्युसेकने नदीमध्ये पाणी सोडण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यामध्ये टप्प्याटप्याने वाढ करून 1 हजार 712 क्युसेक, त्यानंतर 5 हजार 136 क्युसेक आणि दुपारी 12 वाजता 7 हजार 276 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आले.
दरम्यान, पानशेत धरणसुध्दा 75 टक्के भरले आहे. तर वरसगाव धरणात 60 टक्के पाणीसाठा आणि टेमघर धरणात 48 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.