मुंबई – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. २६ वर्षीय श्रद्धाचा निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या आफताब विरोधात सर्वांकडूनच रोष व्यक्त केला जात आहे. आता बॉलिवूडमध्ये देखील या हत्येबाबत रोष व्यक्त होताना दिसत आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं आहे.
श्रद्धाची निघृण पद्धतीने हत्या केल्यानंतर सर्वांकडूनच या प्रकरणाबाबत निषेध व्यक्त केला जात आहे. राम गोपाल वर्मा यांनी देखील याबाबत ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”शांततेत विश्रांती घेण्याऐवजी तिने आत्मा म्हणून परत यावे आणि त्याचे 70 तुकडे करावे”. तर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये तो म्हणतो,“कायद्याच्या भीतीने अशा क्रूर हत्या रोखणं शक्य नाही. अशा नराधमांना बळी पडलेल्यांचे आत्मे जर परत आले आणि त्या आत्मांनी मारेकऱ्यांना मारलं तरच अशा गोष्टी थांबवता येतील. हे सर्व व्हावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो”
Instead of resting in PEACE she should come back as a spirit and cut him into 70 PIECES
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 16, 2022
Brutal murders can’t be prevented just by fear of law ..But they can be definitely stopped if the victims spirits come back from the dead and kill their killers ..I request God to consider this and do the needful 🙏🙏🙏
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 16, 2022
काय आहे नेमकं प्रकरण
श्रद्धा आणि आफताब हे दोघेही काही महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. एका डेटिंग अँपवरून दोघांची ओळख झाली होती. श्रद्धा घरच्यांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत राहत होती. श्रद्धाने लग्नाचा आग्रह केल्याने आफताबने तिचे ३५ तुकडे करून निघृण पद्धतीने हत्या केली. तब्बल सहा महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती.