मुंबई- चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विशेष पत्र लिहिलं आहे. या पत्रात करण जोहरने स्वतंत्र भारताच्या 75 वर्षे पूर्ण होण्याचे औचित्य साधून बॉलिवूडमधील योजनांची माहिती दिली. शुक्रवारी गांधी जयंतीच्या निमित्ताने करणने हे पत्र लिहलं आहे.
करण आपल्या पत्रात म्हणाला कि, “राजकुमार हिरानी यांनी गेल्या वर्षी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एक चित्रपट बनविला होता. आता आम्ही स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे सिनेसृष्टी एक आनंद साजरा करू इच्छिते. भारताची विरता, भारताची मुल्ये आणि संस्कृतीवर एक विशेष चित्रपट तयार करण्याचा मानस आहे. असं करण जोहरने म्हंटलं आहे.
Honourable PM @narendramodi ji…we are humbled & honoured to curate stories of our great nation whilst we celebrate 75 years of India’s independence @RajkumarHirani @aanandlrai @ektarkapoor #SajidNadiadwala #RohitShetty #DineshVijan #ChangeWithin #IndianFilmFraternity @PMOIndia pic.twitter.com/zypmyRf2Qg
— Karan Johar (@karanjohar) October 2, 2020
दरम्यान, करण आपल्या या पत्रात नरेंद्र मोदी, राजकुमार हिरानी, एकता कपूर, आनंद एल राय, साजिद नाडियाडवाला, रोहित शेट्टी आणि दिनेश विजन यांना सुद्धा टॅग केलं आहे.