नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून दिली जात आहे. मागील तीन परिषदांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना दिल्या जाणाऱ्या मदतीची घोषणा करण्यात आली. दरम्यान,आज अर्थमंत्र्यांनी रविवारी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची पुन्हा माहिती देण्यात आली. देशातील गरिबांच्या खात्यात १६ हजार ३९४ कोटी रूपये थेट जमा करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH Finance Minister Nirmala Sitharaman announces the last tranche of #EconomicPackage https://t.co/doq5YvOydo
— ANI (@ANI) May 17, 2020
निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजमधून गरिबांना दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली. सीतारामन यांनी यावेळी , करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि गरिबांवर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये म्हणून सरकारन मागील दोन महिन्यांच्या काळात अनेक उपाययोजना केल्या. गरिबांना, स्थलांतरित मजुरांना मदत देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान गरीब योजनेतंर्गत ही मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले.
तंत्रज्ञानामुळे गरिबांना तातडीनं थेट मदत करता आली. आतापर्यत जनधन खात्यात १० लाख २२५ कोटी रुपये जमा करण्यात आले. विविध योजनातंर्गत १६ हजार ३९४ कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर २५ कोटी गरीब, मजुरांना गहु, तांदूळ मोफत वाटप करण्यात आले, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
स्थलांतर करणाऱ्या मजुरांची काळजीही सरकारकडून घेण्यात आली. या मजुरांना घरी जाण्यासाठी सरकारनं रेल्वे सेवा सुरू केली. त्याचबरोबर त्यांच्या भाड्याच्या ८५ टक्के खर्च केंद्राने उचलला आहे. प्रवासादरम्यान त्यांच्या जेवणाची व्यवस्था सरकारने केली आहे. अन्न धान्य दिल्यानंतर त्यासाठी उज्ज्वला गॅसयोजनेतंर्गत मोफत सिलेंडर देण्यात आले, असे सीतारामन म्हणाल्या. करोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकारकडून सुविधा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन वर्गासाठी १२ नवे चॅनेल सुरू करण्यात आले आहेत. ई-पाठशाळा अंतर्गत २०९ नव्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.