नवी दिल्ली – केंद्र सरकारने जारी केलेल्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे यूपीआयच्या माध्यमातून व्यवहारात वाढ होऊ लागली आहे. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून 3.29 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.
180 कोटी व्यवहाराच्या माध्यमातून या रकमेची देवाण-घेवाण झाली. ऑगस्ट महिन्यात 2.98 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. या महिन्यात झालेल्या व्यवहारात 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
भीम युपीआय ऍपमुळे व्यक्ती व व्यक्ती आणि व्यक्ती व दुकानदारादरम्यान व्यवहार अधिक सुलभ झाले आहेत, असे नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.
टोल आणि पार्किंग चार्जेस डिजिटल माध्यमातून देण्याची योजना यशस्वी झाली असून या माध्यमातून 11 कोटी व्यवहाराद्वारा 1940 कोटी रुपयाची व्यवहार झाले असल्याचे सांगण्यात आले.