भारताने डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना उत्तम यश मिळू लागले आहे. नागरिक आणि कंपन्या डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून आपले काम करू लागल्या आहेत. याची उत्साहवर्धक आकडेवारी समोर येऊ लागले आहे.
जून महिन्यामध्ये 2.62 लाख कोटी इतके डिजिटल व्यवहार झाले असल्याचे सांगण्यात आले. या व्यवहारातून 1.34 अब्ज रुपयांची देवाण-घेवाण झाली आहे. भारताने डिजिटल व्यवहार विकसित व्हावे याकरिता यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही यंत्रणा विकसित केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिजिटल व्यवहार वाढावे याकरिता प्रयत्न करीत आहे.
या संस्थेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, एप्रिल महिन्यात 1.51 लाख कोटीचे व्यवहार झाले होते. त्यानंतर या व्यवहारात वेळोवेळी वाढ होऊ लागली आहे. मे महिन्यामध्ये 1.23 अब्ज एवढे डिजिटल व्यवहार झाले आहेत. आगामी काळात हे डिजिटल व्यवहार वाढतील. या संदर्भात आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत असल्याचे या संस्थेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.