नवी दिल्ली – सरकारी बॅंकांनी डिजिटल अपनांए मोहीम सुरू केली आहे. एका महिन्यातच या बॅंकांनी एक कोटी ग्राहकांना डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी प्रेरित केले आहे.
15 ऑगस्ट रोजी ही मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर बॅंकांनी जाहिरातीद्वारे आणि प्रत्यक्ष संपर्कद्वारा ग्राहकांना डिजिटल पेमेंट कसे योग्य आहे, ह्याची खात्री करून दिल्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली आहे, असे अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बाबत वित्तीय व्यवहार विभागाने ट्विटरवर समाधान व्यक्त केले आहे. त्यानुसार प्रत्येक शाखेला किमान 100 ग्राहकांना डिजिटल व्यवहार स्वीकारण्यासंदर्भात राजी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात अधिकाऱ्यांबरोबर कर्मचारी व इतरांनी सक्रिय भाग घेतल्यामुळे ही कल्पना यशस्वी झाली असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.