रायपूर – मोदी सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांनी जोरदार आवाज उठवला आहे. सरकारची कृषी विधेयके शेतकऱ्याला देशोधडीला लावणारी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. तर नव्या विधेयकांमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होण्यास हातभार लागेल असा दावा सत्ताधारी भाजपने केला आहे. अशातच आज काँग्रेस शासित छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांनी या विधेयकांवरून केंद्र सरकारला जाब विचारला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रिमंडळ शेतकऱ्यांना सांगतंय की शेतकरी आता त्यांचा शेतमाल हवा तिथं विकू शकतील. माझा त्यांना प्रश्न आहे की, शेतकऱ्याला याआधी त्याचा शेतमाल कोठे विकावा याबाबतचे स्वातंत्र्य नव्हते का? केंद्राचा दावा दिशाभूल करणारा आहे.” बाघेल म्हणतात.
यावेळी बाघेल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कृषी विधेयकांना मंजुरी देऊ नये अशीही मागणी केली.
ते म्हणाले, “राष्ट्रपतींनी असंवैधानिक मार्गाने मंजूर झालेल्या या विधेयकांवर स्वाक्षरी करू नये. माझी केंद्र सरकारकडे मागणी आहे की, त्यांनी शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक असणारी ही विधेयके मागे घेऊन, एक देश, एक बाजारपेठ, एक किंमत योजना राबवावी.”
We urge the President not to sign the #farmbills that were passed in Parliament in an unconstitutional manner. We also demand that NDA govt takes back these black legislations & ensure ‘one nation, one market & one price’: Chhattisgarh CM Bhupesh Baghel https://t.co/CyPNf6iIdK
— ANI (@ANI) September 27, 2020