नवी दिल्ली – पेट्रोल, डिझेल दरवाढीचे सत्र कायम आजही कायम आहे. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर अधिक महाग झाले आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला जबर आर्थिक फटका बसणार आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमार याला काही सवाल करत टोला लगावला आहे.
R u not active on @Twitter …
Have u stopped using cars..
Dnt u read news paper….@akshaykumar ….
There has been a steep #PetrolDieselPriceHike just for Ur information https://t.co/f5Dr1UPFhs— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 25, 2020
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून अक्षय़ कुमार यानं १६ मे २०११ रोजी एक ट्विट केलं होतं. “मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती,” असं ट्विट अक्षय कुमार यानं केलं होतं. यावरू आता आव्हाड यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.
Couldn’t even get to my house at nite for all of Mumbai was queuing up for #petrol before the prices rocketed again.
— Akshay Kumar (@akshaykumar) May 16, 2011
ते पुढे म्हणाले, “तू ट्विटरवर अॅक्टिव्ह आहेस का? तू गाड्या वापरणं बंद केलंय का? तू वृत्तपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी, पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे,” असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरवर या ट्विटसोबत अक्षय कुमारलाही टॅग केलं आहे.