नवी दिल्ली – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं. दुसऱ्या लाटेवर अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलेलं नसताना आता करोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू करण्यात आली आहे. काही तज्ज्ञांच्या मते करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातच राजस्थानमध्ये लहान मुलांना करोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे करोनाची तिसरा लाट आली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजस्थानमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लहान मुलं करोनाबाधित झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे राजधानी जयपूरमधून देखील धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात १० वर्षांपर्यंतच्या साडेतीन हजार मुलांना करोनाची लागण झाली आहे. तर ११ ते २० वर्षे वयाची १० हजारहून अधिक मुलं करोनाचे शिकार ठरले आहेत. यावरून राज्यात करोनाची बाधा झालेल्या लहान मुलांची संख्या किती असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंज देत आहे. मात्र तिसऱ्या लाटेची चिंता वाढली आहे. तिसऱ्या लाटेत मुलांवर अधिक परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र राजस्थानमध्ये दुसऱ्या लाटेतच लहान मुलांना मोठ्या प्रमाणात करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तिसरी लाट सुरू झाली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आकडेवारी
- एप्रिलमध्ये 0 ते 10 वर्षे वयाचे एकूण 1672 मुलं बाधित झाले.
-
एप्रिलमध्ये 11 ते 20 वर्षे वयाचे एकूण 4681 मुलं बाधित झाले.
-
1 मे ते 23 मे पर्यंत 0 ते 10 वर्षे वयाचे एकूण 1917 मुलं बाधित झाले.
-
1 मे ते 23 मे पर्यंत 11 ते 20 वर्षे वयाचे एकूण 5341 मुलं बाधित झाले.