गुवाहाटी – हिंसाचार उफाळल्याने आसाम-मिझोरम सीमेवर 26 जुलै रोजी हिंसक चकमक उडाली या चकमकीत आसामचे 6 पोलीस मृत्युमुखी पडले. त्या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे दोन्ही राज्यांतील सीमेवर शांतता प्रस्थापित होण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला.
View this post on Instagram
आसाम आणि मिझोरम ही राज्ये एकमेकांवर आपल्या हद्दीत अतिक्रमण करत असल्याचा आरोप करत होते. त्यातून जूनच्या अखेरपासून सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सीमाभागात हिंसक घटना घडल्या.
View this post on Instagram
उसळलेल्या रक्तरंजित संघर्षात पाच पोलीस अधिकारी सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात मूळचे महाराष्ट्रातील आणि सध्या कछरच्या पोलीस अधिक्षकपदी कार्यरत असलेले वैभव निंबाळकर जखमी झाले होते. निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली असून, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
View this post on Instagram
आसाममधील कछर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. याबाबत त्यांची पत्नी अनुजा हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
शेअर केलेल्या फोटोत वैभव निंबाळकर हे हॉस्पिटलमध्ये वॉकर घेऊन चालण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील जनतेनं आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचा हा निधड्या छातीचा वीर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहिल्याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. निंबाळकर यांचे कुटुंबीय, सुहृद, मित्र परिवार यांच्यासह आसामच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागालाही दिलासा मिळाला आहे.