मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर चौफेर टीका होत आहे. 9 सप्टेंबर कंगना राणावतने ट्वीटमध्ये सांगितल्याप्रमाणे आज ती मुंबईत दाखल होणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेसह कंगना लवकरच चंदीगड एअरपोर्टहून मुंबईला येणार आहे.
कंगना बाहेरून विमानाने येणार म्हणून तिला क्वारंटाईन करणे अनिवार्य:
BMC महापौर मॅडमअमीर खान टर्कीहुन.. अल्लादिनच्या चटईवर बसून आला होता का मुंबईत ? 🤣😂
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 9, 2020
दरम्यान, विमानाने मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला पालिकेच्या सुधारित आदेशांनुसार १४ दिवस विलगीकरणात राहावेच लागेल. सर्वासाठी नियम समान आहे. त्यातून सूट हवी असल्यास सरकारी अधिकाऱ्यांनी अर्ज करावा, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणाचेही नाव न घेता स्पष्ट केलं होतं. याच मुद्याला अनुसरून आता भाजपानं टोला लगावला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेता अमिर खानचा संदर्भ देत महापौर किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला.
चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे की,’“कंगना बाहेरून विमानाने येणार म्हणून तिला क्वारंटाइन करणे अनिवार्य असल्याचं मुंबईच्या महापौरांनी सांगितलं. परंतु अमिर खान तुर्कस्थानाहून अल्लाउद्दीनच्या चटईवर बसून मुंबईत आला होता का?,” असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून महापौरांना टोला लगावला आहे.