नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली आहेत. धोनीने २३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेशविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सामन्यातून सुरवात केली होती. धोनीची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते.
विकेटकीपिंग असो किंवा फलंदाजी असो, भारताला खेळामध्ये अव्वल स्थानी नेण्यात धोनीचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. धोनीला पहिल्याच सामन्यात नैराश्य आले होते. पहिल्या सामन्यात खाते न उघडता शून्यावर धावबाद झाला होता. त्यानी खचून ना जाता परिश्रम घेतल्यानंतर धोनीची भारतीय संघाचा कर्णधारपदी निवड करण्यात आले.
रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कप २०११ च्या अंतिम सामन्यात म्हणाले होते कि, “धोनीने हा सामना शानदार पद्धतीने संपवला. या सामन्यात भारताने २८ वर्षांनंतर भारताने विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती.”
कर्णधार म्हणून धोनीने कित्येक विक्रम आपल्या नावावर केले आहे. एकदिवसीय विश्वचषक, टी -२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. तसेच त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत भारताला नंबर एक वर नेले.
धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत त्याने भारताकडून ३५१ एकदिवसीय सामने आणि ९८ टी -२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यांत भारतासाठी ४८७६ धावा, टी -20 मध्ये १०,७७३ एकदिवसीय १६१७ धावा केल्या आहेत.
२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्या एकदिवसीय विश्वचषकानंतर धोनी भारतीय संघातून निवृत्ती घेतली आहे. पण पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या संदर्भात तो अजूनही संघातील महत्त्वाचा बॅग असल्याचे मानले जात आहे.