मुंबई – ‘वादग्रस्त प्रकरणातून माघार घेण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत. जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. संरक्षण मिळण्यासाठी पोलिसांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे, अशी माहिती रेणू शर्मा यांचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी माध्यमांमसमोर बोलताना दिली.
रेणू शर्मा यांच्यावर केले जाणारे हनिट्रॅपचे आरोप खोटे आहेत. त्या उद्या माध्यमांसमोर येऊन बोलणार आहेत, अशी माहितीही वकिल त्रिपाठी यांनी दिली आहे.
दरम्यान, बलात्कार प्रकरणात अडचणीत सापडलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास राष्ट्रावादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी घेतली आहे.