मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच बाकी सर्व गारद म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही गारद का? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.
देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सामनामधून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, सामना’ किती जण वाचतात? करोनाबाबत एकही अग्रलेख सामनामध्ये नसल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच सामना हे आता शिवसेनेचे नाही, तर तीन पक्षांचे मुखपत्र असल्याचीही टीका फडणवीसांनी केली. बदल्यांचे आणि फोडाफोडीचे राजकारण करण्याऐवजी करोनावर लक्ष द्या, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
कुणी घरी बसले असेल तर त्याला आम्ही काय करणार? आम्ही राजकारणासाठी दौरे करीत नाही. जनतेला भेटण्यासाठी कितीही स्थिती वाईट असली तरी आम्ही त्यांना जाऊन भेटणारच, त्यांच्या समस्या समजावून घेणारच, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
कुणी घरी बसले असेल तर त्याला आम्ही काय करणार?
आम्ही राजकारणासाठी दौरे करीत नाही. जनतेला भेटण्यासाठी कितीही स्थिती वाईट असली तरी आम्ही त्यांना जाऊन भेटणारच, त्यांच्या समस्या समजावून घेणारच : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis pic.twitter.com/ap835zb2as— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 9, 2020